Posts

जगणं खरवडून टाकणारा दुष्काळ !

Image
पाच धा सालाआदी पहाटं झाली सगळ्यासनी गुरं चरायला सोडायची घाई व्हायाची. राती उशिरा दमून निजलेली कुणी अनसुया, रखमा किंवा लक्ष्मी घरधनी उठलेला पाहून आपुनबी कामाला लागायची. हगरी चांदनी उगवली की अाताबी गाव जागा होतो. पर, कामाच्या घाईन नव्हं तर कुणाच्या तरी जाण्याची बोंब उठल्यानं. कलागत व्हावी, चोरी व्हावी असं कुणाच्या कुडात काही राहल्यालं न्हाई. चार सालाआधी दुष्काळ पडला तिथंच पुंजीची राख झाली आता अंगाला फासायला तीबी उरली न्हाई. आता बोंब उठती ती कुणाच्या न कुणाच्या फाशी घेण्यानं किंवा पिकावर फवारायचं औषिध प्याल्यानं. हप्त्यात एकतरी मानूस जानार अन् गावात कालवा उठणारं हे समद्यासनी तोंडपाठ झालयं. दिस उगवताच पारावर माणसं गोळा व्हत्यात, कशानं गेला वो रामा असं कुणीस बोललचं तर मानसं खुळ्यागत त्याच्याच तोंडाकडं पाहत्यात. आज कुंभाराच्या गल्लीत तर उद्या मांगाच्या वस्तीत रोज कुठं न कुठं रडारड अन् कालवा. तासा दोन तासांत पंचनामा झाला की पै पाहुने पसार हुत्यात. कच्च्याबच्च्यांसाठी कुणी पदरं पसरलाच तर त्यात काय टाकायचं या ईचारानं त्यांचही तोंड काळठिक्कर पडतं. आठ दिवसांतच हा ईषय जुना होतो अन्् गाव पु...

राज्यकर्त्यांचा अट्टहास अन् शिक्षणाचा डाेस

Image
मूळ उद्देश हरवला की चांगल्या योजनेचा कसा बट्याबोळ होतो, याचं शालेय पोषण आहार योजना हे सर्वांत चांगलं उदाहरण. विद्यार्थ्यांना लाभ होवो अथवा न होवो आपल्याला फायदा होताेय ना, या न्यायानं राबवल्या जाणाऱ्या या योजनेबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आणि चर्चेला नवा विषय मिळाला. पण, निष्कर्षांविनाच पूर्ण होणाऱ्या अन्य विषयांच्या चर्चांप्रमाणेच कालांतराने हा विषयही मागे पडेल अन् राज्यकर्त्यांच्या अट्टहासाची खिचडी शिजवत राहील... साधारणत: ६०च्या दशकात राज्यातील ग्रामीण भागामध्ये ठिकठिकाणी शाळा सुरू होत होत्या. ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणाचे बाळकडू मिळावे, यासाठी धडपडणारे अनेक जण तुटपुंज्या साधनांच्या आधाराने लढत होते. यात कर्मवीर भाऊराव पाटलांसारखे तपस्वी होते अन् पुढे शिक्षणसम्राट बनून राजकारणात शिरकाव करणारेही होते. यथावकाश सरकारनेच जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राज्यभरात शाळा सुरू केल्या अन् शिक्षणाची गंगा वाहू लागली. एक काळच असा होता की शाळाबाह्य मुलांच्या पालकांना दंड ठोठावला जाई. मुलांनी शाळा चुकवू नये, एकही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी सुरू झालेल्या या उपाययोजनांमुळे ...

छोट्या रकमेच्या कर्जाची मोठी गोष्ट

Image
आर्थिक सुबत्ततेची फळे चाखणाऱ्या आपल्या देशातील अर्धिधिक लोकसंख्या अजूनही दारिद्र्यातच जगते आहे. समाजाचा काही भाग शिक्षणाच्या जाेरावर प्रगतीच्या लाटेवर स्वार झालेला असतानाच अज्ञानातून आलेलं दारिद्र्य आणि पिढ्यान पिढ्या दारिद्र्याशी झगडण्यामुळं पुन्हा अज्ञानाच्या अंध:कारात चाचपडणाऱ्या गरिबांपुढे रोजच्या जगण्याचाच प्रश्न असतो. आपल्या आसपासच्या देशांची परिस्थितीही थोड्याफार फरकाने अशीच आहे. परतफेडीची शक्यता नगण्य असल्यामुळे बँकांही या लाेकांना नजरेआड करतात. त्यामुळे जगण्याचे साधन शोधण्यातच हयात खर्ची पडणारी ही माणसे अशीच खितपत पडतात. या भणंगांना जगण्यासाठी बळ देत आर्थिक बळ देणाऱ्या बांगलादेशातील मोहम्मद युनूस यांच्या ग्रामीण बँकेच्या प्रयोगाची जगभरात वाहवा झाली. युनूस यांचा नोबेल पुरस्काराने गौरव झाला त्याच सुमारास भारतातही अशाच एका प्रयोगाची मुहूर्तमेढ रोवली जात होती.       साधारणत: डिसेंबर २००६ चा हा काळ होता. युकेमध्ये कार्यरत असणारे रामक्रिष्णा एनके आणि स्मिता रामक्रिष्णा या दोघांनी परदेशातील नोकरी सोडून भारतात सामाजिक काम सुरू करण्याचा निर्णय घेतला. बालमजुरी रोखण्या...

‘म’ मराठवाडी बोलीचा

Image
मराठवाडा हा शब्द उच्चरताच समोर दिसू लागतो भौगोलिक वैशिष्ट्यांनी नटलेला सुंदर प्रदेश, सुरेख वनराई, औपचारिकतेचा लवलेशही नसणारी भोळीभाबडी, काहीशी अघळपघळ माणसं... अनौपचारिकपणा हीच या प्रदेशाची आणि या भागातील माणसांची खासियत. हीच खासियत साहजिकच बोलीभाषेतही उतरली आहे. इतर अनेक भाषांतील शब्द आपल्यात सामावून घेतानाच या मराठवाडी बोलीने आपला मूळ ठसकाही जपला आहे. हिरव्या मिरचीचा ठसका आणि इंग्रजी चिंचांचा मधुर स्वाद अशा अनेक लहेजांचे उपपदरही या बोलीभाषेला आहेत. कोल्हापूरचा तांबडा रस्सा म्हटलं की जसे जिभेला डोहाळे लागतात, तद्वतच मराठवाडी भाषेतील मायेची हाक ऐकली की ओळखीपाळखीचे बंध आपसूक गळून पडतात. अशा या लज्जतदार मराठवाडी बोलीभाषेतील १० हजार शब्दांचा संग्रह करण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रयोगाविषयीचा हा लेख... ................................................. तुम्ही फँड्री पाहिलाय? मराठवाडी भाषेची ओळख करून घ्यायची असेल, तर त्यासाठी फँड्री पाहायलाच हवा. फँड्रीची कथा घडते त्या भागातील थोडंसं उस्मानाबादी पद्धतीचं वागणं-बोलणं आणि शब्दांनी हा चित्रपट नटला आहे. प्रत्येकाला ही आपलीच कथा वाटाव...

उद्योजकांच्या नवनिर्मतीच्या भरारीला ‘फ्लिपकार्ट’चे पंख

नवा व्यवसाय सुरू करायचाय ? , सध्याचा व्यवसाय आणखी वाढवायचाय ? जिद्द आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर काहीच अवघड नाही. उरला विषय व्यवसाय वृद्धीच्या संधीचा ! तर हा लेख तुमच्यासाठीच आहे, कारण यशस्वी व्वावसायिक होण्याचं तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी साथ मिळणार आहे ती फ्लिपकार्टची ! आवर्जुन वाचाच...... सुरुवात तर करा व्यवसाय सुरू करताना यश-अपयशाची धास्ती वाटणं सहाजिक आहे. पण, यश मिळेल की नाही या चिंतेनं त्रासून जाणं चुकीच आहे बरं का. यश मिळवायचच असा चंग बांधणार असाल तर अनेक पर्याय तुमच्या समोर हात जोडून उभे राहतील. व्यवसाय सुरू करताना पहिली अडचण येते ती भांडवलाची. पण, तुमच्या बाबतीत हा प्रश्न नसला तर पहिला डाव तुम्ही जिंकला आहात असं समजा. आता उरला प्रश्न कोणता व्यवसाय करायचा आणि आपलं उत्पादन ग्राहकांपर्यंत कसं पोहोचवायचं हा, त्याचं उत्तर तयार आहे हो, सुरुवात तर करा..... स्वत:चा व्यवसाय उभारू पाहणाऱ्यांना पहिली ठेच लागते ती भांडवल उभे करताना. पुढे ग्राहक मिळवणे, वाढत्या स्पर्धेत ते टिकवणे, नवीन ग्राहक जोडणे ही कसरत करताना जीव मेटाकुटीला येतो अन् बहुतांश जण परिस्थित...

बाजीगर राष्ट्रवादी

मतदार किस झाड की पत्ती ?

प्रत्येक परीक्षेत काठावर पास होणाऱ्या विद्यार्थ्याला ६५ टक्के मार्कांचे अप्रुप वाटणे स्वाभाविक आहे. याप्रमाणेच राज्यात ६३ टक्के मतदान झाल्याची आकडेवारी हाती येताच माझ्यासारख्या मीडियामंडुकांनी हे प्रमाण मागील निवडणुकांपेक्षा कसे जास्त आहे, याचा हवाला देत बडबड सुरू ठेवली. पण, मतदानाचे प्रमाण का वाढत नाही, मतदान या राष्ट्रीय कार्यापासून चार हात लांब राहणे पसंत का करतात, याचा ऊहापोह झालाच नाही. ..... बुधवारी म्हणजेच १५ ऑक्टोबर रोजी विधानसभेसाठी राज्यभरात मतदान पार पडले. "पार पडले' हा शब्द इथे जाणीवपूर्वक वापरला आहे. कारण मतदार किंवा महाराष्ट्र याबद्दल एकाही राजकीय नेत्याला काहीही देणेघेणे नाही, हे त्यांनीच कृतीतून दाखवून दिले आहे. मतदान होताच वृत्तवाहिन्यांवर एक्झिट पोलच्या तोफा धडाडू लागल्या. कुणाला किती जागा मिळणार हे ठासून सांगत महाराष्ट्रातील जनतेचा कौल कुणाचा बाजूने असेल, यावर चर्चाही सुरू झाल्या. राज्यात मतदानाची आकडेवारी किती टक्क्यांनी वाढली, त्याचा कुणाला अन् कसा लाभ होणार यावरही चर्वितचर्वण सुरू झाले. प्रत्येक राजकीय पक्ष आणि त्यांचे प्रमुख नेते आम्हीच योग्य कसे, य...